मला नेहमी वाटत आलंय की, अमीरखाँच्या गाण्याची लय आपल्या लिखाणाला असावी
कोमल ऋषभ लावला की, त्याच्याभोवती कुठलेही संकेत नाहीत, कोमल ऋषभ हा फक्त कोमल ऋषभ आहे. तीव्र मध्यम लावला की फक्त तीव्र मध्यम आहे. कसलेही मानवी अनुभव त्याला चिकटून येत नाहीत. पण हे सगळे स्वर एकत्र आले की, ते बुद्धीच्या पलीकडचा जो प्रदेश आहे तिथं जातात. त्या प्रदेशात आपल्याला घेऊन जातात. म्हणून मला सगळ्या गाणार्यांचा नेहमी हेवा वाटतो, चांगलं गाणार्यांचा. कुमारांचं गाणं ऐकताना, मुकुलचं गाणं ऐकताना!.......